अतिवृष्टीने मन भयभीत झालं काव्य पुष्प २३८





    अतिवृष्टीने मन भयभीत झालं


पावसाच्या आक्रंदाने 

मन भयभीत झाले

सैरावैरा पाण्याचे लोंढे 

पायथ्याला भिडले |



जीवनच भुईसपाट केले

घरे जनावरं उध्दवस्त झाले

काळाने झडप घातली

संसार उघड्यावर पडले|


अतिवृष्टीने पायथ्याच्या वस्त्या 

दरडीखाली गडप झाल्या 

सगळीकडे हाहाकार उडाला

आसवांच्या आक्रोशधारा झाल्या |


 

शेतीभाती वाहून गेली

सुन्न मनं बेचिराख घरं

कालचा धुवांधार पाऊसाने

काळजाला पडले चरं|


पावसाचा हवाहवासा चेहरामोहरा 

आता नकोसा वाटू लागला

धुवाॅंधार  आकांडतांडव करून 

हृदयाला मात्र तीव्र चटका दिला|


हे विधात्या पाऊसराजा 

आता रणकंदन थांबव 

रौद्ररूपातील विदारक खेळ 

आता तरी थांबव|


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड