Posts

Showing posts from April, 2021

२२|पुस्तक परिचय,भारत कधीकधी माझा देश आहे.

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-२३ पुस्तकाचे नांव--भारत कधीकधी माझा देश आहे  लेखकाचे नांव--रामदास फुटाणे प्रकाशक-श्रीविद्या प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०१०पंचमावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-९६ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--काव्यसंग्रह मूल्य--६०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚 २३|पुस्तक परिचय भारत कधीकधी माझा देश आहे  रामदास फुटाणे  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾      'नऊ ऑगस्टमुळे ,पंधरा ऑगस्ट दिसला पंधरा ऑगस्टमुळे,सव्वीस जानेवारी दिसला तरी एकाहत्तर वर्षांपासून,प्रजासत्ताक हरवला आहे! व्यक्तिसत्ताक पुष्पचक्र पाहून,स्मृतिस्तंभ गहिवरला आहे'  "भारत कधीकधी माझा देश आहे" या उपहासात्मक काव्यसंग्रहातील 'खंत' या कवितेतील हे भाष्यकाव्य आहे.या काव्यसंग्रहातील विडंबन,वात्रटिका आणि चारोळ्या महाराष्ट्रातील नामवंत प्रसिध्द उपाहासिकाकार, वात्रटिकाकार,भाष्यकवी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बहुआयामी व्यक्तिमत्त्व रामदास फुटाणे यांच्या आहेत. राजकारणग्रस्त समाज वास्तवाचे विडंबन करून उपहासात...

२१|पुस्तक परिचय,व्यक्ती आणि वल्ली

Image
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 २२|पुस्तक परिचय व्यक्ती आणि वल्ली लेखक-पु.ल.देशपांडे 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾    महाराष्ट्राच्या रसिक श्रोते अन् वाचकांना मंत्रमुग्ध करणारे प्रतिभावंत शाब्दिक कोट्यांचे महामेरू साहित्यिक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते आदरणीय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तमाम महाराष्ट्राचे लाडके पु.ल. यांचे हे अक्षरशिल्प 'व्यक्ती आणि वल्ली', रसिकांच्या मनात ठाण असलेल्या व्यक्ती रेखांना विनोदी मिश्किली ढंगाचा साज देऊन रेखाटलेलं पुस्तक.प्रत्यक्ष कथा आदरणीय पु.ल.(भाईंच्या) तोंडून ऐकताना बघताना रसिक श्रोते हास्याच्या सागरात चिंब भिजतात. मनसोक्त हसतात.अतिशय गाजलेले हे पुस्तक आहे.या पुस्तकास १९६५साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.हा व्यक्तिचित्र संग्रह प्रकारातील आगळावेगळा नाविन्यपूर्ण मिश्किली भाषेत व्यक्तीरेखाटन केलेलं आहे.लेखक आणिव्यक्ती यांच्यातील संवाद प्रसंग वाचताना अक्षरशः वाचक हरखून जातो.रसास्वाद घेत मनसोक्त हास्याचा आनंद घेतो.या व्यक्तींना बोलकं करण्याचं काम   लेखनशैलीने   केले आहे.   ही माणसं आप...

२०|मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द, पुस्तक परिचय

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-२१  पुस्तकाचे नांव-- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द  लेखकाचे नांव-- डॉक्टर जयसिंगराव पवार प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- द्वितीयावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-२१२ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--संशोधनात्मक ग्रंथ मूल्य--२४०₹ 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾  २१|पुस्तक परिचय           मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द लेखक-डॉक्टर जयसिंगराव पवार 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 महाराष्ट्राचे आराध्यदैवत स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळात अनेक संकटं हिंदवी स्वराज्यावर चाल करून आली.परंतू  महाराजांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांच्यावर मात केली. त्यांच्यानंतर लगेचच 'मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द'सुरू झाले.सुमारे २६ वर्षाच्या कालखंडात मराठ्यांवर कोसळलेली संकटे सामान्य नव्हती.या धामधुमीच्या मोठ्या शौर्याने लढा देवून संकटांवर मात करून  अस्तित्व टिकवून महाराष्ट्रधर्म वाढविला. बादशाह ...

१९|श्वासागणिक प्रदूषण, पुस्तक परिचय

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, ओझर्डे-वाई पुस्तक क्रमांक-२० पुस्तकाचे नांव--श्वासागणिक प्रदूषण लेखकाचे नांव-- एन.मणिवासकम् अनुवाद--क.कृ.क्षीरसागर प्रकाशक-नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती एकूण पृष्ठ संख्या-१०८ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--ललित मूल्य् -४५₹ 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾  २०|पुस्तक परिचय               श्वासागणिक प्रदूषण                एन.मणिवासकम्  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾   नैसर्गिक स्त्रोत चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने आपण पर्यावरणाच्या गर्तेत सापडले आहोत.  विकासाबरोबर  प्रदूषण  येणार  हे  जरी आपल्याला मान्य असले तरी त्याचे प्रमाण सध्याच्या स्तरापर्यंत जायला नको आहे ! प्रदूषण सुसह्य मर्यादेपर्यंत नियंत्रित राहिले पाहिजे. त्याचा पृथ्वीला धोका होऊ नये इतके ते वाढू देता कामा नये.विकसित देशातील ...

१८|पुस्तक परिचय, प्राचार्य मिलिंद जोशी

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-१९  पुस्तकाचे नांव--  प्राचार्य   लेखकाचे नांव--प्रा. मिलींद जोशी प्रकाशक- अक्षरब्रम्ह प्रकाशन, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑक्टोंबर २००३ प्रथमावृत्ती  एकूण पृष्ठ संख्या-१६६ वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--चरित्रग्रंथ  मूल्य--१५०₹ 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 📚📚१९||पुस्तक परिचय                प्राचार्य प्रा.मिलिंद जोशी 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾   'प्राचार्य'ऋषितुल्य प्रतिभावंत अमोघ वाणीचे सरस्वती पुत्र,वैखरीचे वारकरी,मराठी सारस्वतांच्या दरबारातील थोर विचारवंत, तत्त्वचिंतक,प्रज्ञावंत,राष्ट्रपुरुष व संतमहात्म्यांचे भाष्यकार आणि थोर महापुरुषांची जीवनकार्ये व विचार घराघरांत पोहचविणारे बहुजन समाजातील प्रभावी व्याख्याते, ख्यातनाम लेखक आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले. अमोघ वाणी,संथ-लयबध्द शब्द फेक,नादमधुर भाव,नितळ ओघवत्या प्रवाहा सारख्या वक्तृत्वशैलीने सरांनी महाराष्ट्राला दि...

१७|पवनाकाठचा धोंडी,गोनिदा , पुस्तक परिचय

Image
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 📚📚 १७||पुस्तक परिचय पवना काठचा धोंडी गोपाल नीलकंठ दांडेकर  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज चतुरस्त्र कलाकार आहेत.संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटूंबिय म्हणजे स्वरसाजाचा चढता आलेख आहे.सत्तरीच्या दशकातील लतादीदी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या श्रवणीय गाण्यांनी मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी गायलेली कित्येक गाणी आजही आपण धून  कानावर पडलीकी गुणगुणायला लागतो.'काय बाई सांगू, कसं गं सांगू' किंवा' वाटतं दंवानं भिजून गेली,उन्हं दारात सोन्याची झाली,माय भवानी पावनी आली.' अशी त्या काळातील अजरामर श्रवणीय गाणी सन१९६६ साली कृष्णधवल रुपातील चित्रपट'' पवना काठचा धोंडी" होता.याचे निर्माते उषा मंगेशकर आणि विनायक ठाकूर, तर संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि शशी साबळे यांनी गायलेली उत्तमोत्तम गीतं यात होती तर 'कथा' होती,प्रतिभावंत साहित्यिक कादंबरीकार "गोनिदा"यानावाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व गोपाल नीलकंठ दांडेकर होत...

१६|नापास मुलांचे प्रगतिपुस्तक, अरुण शेवते

Image
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 १६|| पुस्तक परिचय नापास मुलांचे प्रगतिपुस्तक संपादन-अरुण शेवते 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾    आजचं स्पर्धेचे युग आहे.कित्येक ठिकाणी माणसं रांगेत उभी आहेत.अशा वेळी रांगेतल्या माणसांकडे आत्मविश्वासाचे बळ त्यांच्या मनगटात पाहिजे.वेळच्या वेळी बालपण ते कुमारवयातील झालेल्या चूका समजून घेणं हे पालकांचं काम आहे.योग्य वेळीच मुलांना समजून घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे.एक मुलगी संपादक अरुण शेवते यांना सांगत होती.'ती नापास झाली तेव्हा वर्षभर तिच्या वडिलांनी तिच्याशी अबोला धरलास होत,तो ती पास झाल्यावरच सोडला.'नापास होणं म्हणजे वाईट आणि क्लेश निर्माण होते.मन सैरभर होते.त्यात आपल्याच मुलीशी अबोला धरतो अतिवाईट, शिक्षणापेक्षा आपली मुलं महत्त्वाची आहेत.आपण पालकच त्यांच्यावर अपेक्षांचा ओझं लादत असतो.त्याचा कल समजून न घेता प्रेशर देत असतो.ज्याला आपण जग दाखवलं,त्याच्या जगात किंचितसा अंधार निर्माण झाला तर त्याला समजून घेणं आवश्यक आहे.नापास होणं हा तत्कालिन अपघात असतो.पण हा अपघात म्हणजे पूर्ण आयुष्य नव्हे!ऊन-सावल्यांचा खेळातील लहानसा ठिपका होय.थोडं सावरलं तरी तो क्षणात धूसर ...

१५|गुंफण सुनीलकुमार धस पुस्तक परिचय

Image
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾📚📚१५ |पुस्तक परिचय                  गुंफण   सुनीलकुमार धस 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾      'छंदाशिवाय आयुष्य म्हणजे फक्त जगणं,कुणी साद घातली तरी , कधी वळून न बघणं' माणसाच्या जीवनातील चांगले छंद हे मनाला वळण लावतात.बौध्दीक व भावनिक भूक भागवितात.एकरुपता आणि तन्मयतेचा संदेश देतात.असे संदर्भ देणारे लेखक व संकलक सुनीलकुमार धस यांच्या विविध छंदांचा ,"अनमोल विचारांचा दुर्मिळ खजिना" ,'गुंफण' या पुस्तकात वाचायला मिळतो.यात  सुविचार,शब्दांचेधन,विचारधन,कोटस्, अवतरणे, काव्यरचना, चारोळ्या व शेरोशायरी  इत्यादी मनाला भावणाऱ्या विचारांची शिदोरी समाविष्ट केली आहे.ही अवतरणे म्हणजे वाचकांना संग्रहरुपात खजिनाच भेटतो.या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांची लाभली आहे. मनाची श्रीमंती आणि परिश्रमाची संस्कृती 'गुंफण' पुस्तकात आहे.त्यांची सुविचार व काव्य शिदोरी रसदार आहे.ते छंदाविषयी म्हणतात,'छंदाशिवाय आयुष्य म्हणजे फक्त जगणं,कुणी साद घातली तरी ,कधी वळून न बघण...

१४|पुस्तक परिचय, विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा

Image
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾📚📚 १४|पुस्तक परिचय विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा  डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम  ----------------------------------------------- भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर अनेक पुस्तके लिहिली आहेत. अंतराळात पाठविलेल्या उपग्रहांच्या जडणघडणीत त्यांनीमौलिक भूमिका बजावली होती.'अग्नी'सारखी क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाचे ते प्रमुख होते.भारतातील सर्वौच्च सन्मान "भारतरत्न" पारितोषिक देवून गौरविण्यात आले आहे.त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत.त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संशोधनपर उल्लेखनिय कार्य केले आहे.सहाध्यायी लेखक सृजन पाल सिंग हे 'चतुरस्त्र विद्यार्थी' म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद चे सुवर्ण पदक विजेते आहेत.ते ग्रामीण भागात फिरून विकासात्मक व्यवस्था करण्यासाठी विविध संस्थासोबत काम करतात.अनेक नियतकालिकांतून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत.तसेच मराठीत अनुवादित करणारे  प्रणव सुखदेव मराठी दैनिकात पत्रकार असून अनुवाद प्रकल्पासाठी 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'ची शिष्यव...