फॅमिली टूर --२ नाशिक ते काशिद बीच
फॅमिली टूर- ६ जून २०१६
ओझर्डे-पुणे-देहु-आळंदी-चाकण-नाशिक-त्रिंबकेश्वर-वणी-सापुतारा-नाशिक-मुंबई-- अलिबाग फोर्ट --काशिदबीच व पोलादपूर व महाबळेश्वर करून परत
ओझर्डे-पुणे-देहु-आळंदी-चाकण-नाशिक-त्रिंबकेश्वर-वणी-सापुतारा-नाशिक-मुंबई-- अलिबाग फोर्ट --काशिदबीच व पोलादपूर व महाबळेश्वर करून परत
[5/14, 9:15 PM] ravindralatinge: 🍂🔅🍂🔅🍂🔅🍂🔅🍂🔅माझी भटकंती
क्रमशः भाग- ४१
दिनांक ६ जून २०१६
🛕 देहू आळंदी चाकण त्रिंबकेश्वर ते वणी 🌱
➖➖➖➖➖➖➖➖➖
भाग एक
दिवाळी व उन्हाळी सुट्टीत कुटुंबातील सगळ्यांसोबत रोजच्या जीवनातून विरंगुळा म्हणून धार्मिक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळे पहायला जायच हा मनातला शिरस्ता... नवीन ठिकाणाची ओळख व देवदर्शन घडावे यासाठी नियोजन. मुलांच्या ही परीक्षा झालेल्या .वडिलही म्हणाले होते,'नाशिक त्रिंबकेश्वर बघायला घेऊन चल.' .दोनतीन दिवस फिरुन येवूया.हर्षदलाही फोन वरून दोन-तीन दिवसाची रजा फिरायला जाण्यासाठी काढायला सांगितली. त्याचा होकार येताच मग विचार विनिमय करून पप्पूची गाडी ठरवली.
६ जूनला फॅमिली टूरला निघालो.वाई-पुणे हायवेने प्रथम देहू ला गेलो.सांप्रदायिक वारकऱ्यांचे दैवत श्री संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं, इंद्रायणी काठा वरील गाथा मंदिर, इंद्रायणी घाट पाहून आम्ही आळंदीला आलो.तिथं दर्शनासाठी गर्दी असल्याने मुखदर्शन घेऊन चाकणला हर्षद कडे आलो.तोही आमच्यात सामील झाला.दुपारी एक दीड-दोन वाजला असेल.तो दिवस दहावीच्या निकालाचा दिवस होता.. पुतणी प्रियंकाला सहज विचारले ,'तुला किती टक्के मार्क पडतील.'
ती म्हणाली,'८० ते ८५ टक्के पडतील.तेवढ्यात भैय्याने तिचा परीक्षानंबर विचारुन आॅनलाईन रिझल्ट पाहून ९२ टक्के म्हणाला.तिला प्रथम खरेच वाटाना.मग त्याने मार्कलिस्ट दाखविले...मग काय आनंदी आनंद...आम्ही सगळ्यांनी गाडीत तिचे अभिनंदन केले.दरम्यानच्या काळात घरुनही तिला अभिनंदनाचे फोन आले.. खुप आनंदाचा क्षण आम्ही जवळच्याच धाब्यावर मस्तपैकी तिच्या आवडीची डिशेस मागवून सेलिब्रेट केला...तिचा फोटो काढून हार्दिक अभिनंदनाची इमेज फेसबुक व व्हाटसग्रुपवर शेअर केली.. मस्तपैकी जेवण करून नाशिककडे
निघालो
नाशिक मधून त्रिंबकेश्वरला आलो.गाडी पार्किंग मध्ये लावली.देवदर्शनासाठी निघालो.दर्शन रांगेत भरपूर गर्दी होती.आत प्रवेश करतानाच मोबाईल कॅमेरे व पर्स नो अलाउड असल्याने लॉकरमध्ये ठेवून रांगेत उभे राहिलो... मुखाने ओम नमो शिवाय.हर हर महादेव नामघोष करत पुढे सरकत होतो.दीड एक तासाने देवाचे दर्शन झाले.सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले.मनोभावे दर्शन घेऊन येताना वडिलांची इच्छा पुर्ण झाले चे समाधान चेहऱ्यावर दिसत होते. रांगेच्या सुरवातीलाच येऊन लॉकरमधील साहित्य तपासून घेतले.व गाडीकडे आलो. मंदिर पाहिल्याने मन भारावून गेले.सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.गोदावरी नदीचे उगमस्थान आहे.ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी आहे. पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. प्रसाद खरेदी करून गाडीजवळ आलो.गाडी होती.हर्षद व पप्पू अजून माघारी न आल्याने वेटिंग करत थांबलो.थोड्यावेळाने दोघेही आल्यावर नाशिककडे रवाना झालो.... सायंकाळ होत आली होती.
क्रमशः भाग- ४२
भाग दोन
नाशिकमध्ये आल्यावर चौकशी करत करत पंचवटी घाटावर पोहोचलो... गोदावरीच्या काठावरील प्रशस्त घाट . चौपाटी सारखी गर्दी होती...अनेक मंदिरे घाटावर आहेत.. संपूर्ण घाट फिरलो.मस्तपैकी एका ठिकाणी बसून ओल्या भेळीचा आस्वाद घेतला. जवळच्या एका मंदिरात वाद्यवृंदा आरती सुरू होती.थोडावेळ आरतीचा लाभ घेऊन पुढे वणीकडे मार्गस्थ झालो..वाटेतच एका धाब्यावर जेवण केले..कळवण मधून नांदुरीत आलो.. घाटरस्त्याने मध्यरात्रीच्या वेळी वणीत पोहोचलो..एक दोन ठिकाणी लॉजिंग चौकशी केली.फुल्ल होते.तिसरा लॉज बऱ्यापैकी होता.दोन रुम घेतले.. तिसऱ्या मजल्यावर रुम असल्याने वाऱ्याचा वेग वाढला की खिडक्यांचा जोरदार आवाज यायचा...वारं आत घुसायचं.त्याच अवस्थेत विश्रांती चा प्रयत्न केला..
सकाळी लवकर आवरून सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी निघालो.सकाळी सात वाजताही बऱ्यापैकी गर्दी होती.वडिलांना पायऱ्या चढणे उतरणेचा त्रास होईल म्हणून पायथ्याशी थांबविले.बाकीचे सगळे पायऱ्या चढत गडावर गेलो.. गडाच्या मध्येच देवीचे मंदिर आहे..अनेक छोटे मोठे पाण्याचे कुंड पायऱ्या चढताना दिसतात...आदिशक्ती साडेतीन पीठांपैकी एकपीठ म्हणून याची शक्तीपीठ म्हणून लौकिक आहे.. पायऱ्या चढताना अंगातुन घाम येत होता.वाऱ्याची मंद झुळूक आली की गारवा जाणवला की छान वाटत होते...सकाळच्या प्रसन्न व मंगल मय वातावरणात देवीचे दर्शन कुटूंबासह व्यवस्थित झाले.थोडा तिथेच विसावलो.वारे वेगाने यायचे. डायरेक्ट गडावर जाण्यासाठी नवीन वाटेचे कामकाज सुरू होते.... पायऱ्या उतरून पायथ्याशी आलो.तिथेही दर्शन घेऊन.सर्वांचा ग्रुपफोटो काढला.द्रोणातील रानमेवा करवंदे व जांभळं घेऊन सगळ्यांनी खाल्ली. व लॉजवर येऊन आवराआवर करून गाडीतून परिसरात फिरायला गेलो.परिसरात छोटीछोटी झाडं होती...समोर डोंगररांगा दिसत होत्या. आम्ही तलावाजवळ गाडी थांबवली.
बांधीव तलावाजवळ भाविकांची स्नानासाठी वर्दळ होती.भाविक श्रध्देने त्या तलावात स्नान करीत होते.. काहींची देवीच्या यात्रेची तयारी सुरू होती.भोजनाची तयारी दिसत होती.देवीचा देव्हारा घेऊन ढोल,सनई वाद्यात वाजत-गाजत येत होता.काहीजण पंगत धरुन जेवत होते आम्हीही डोंगरमाथ्यावर रपेट केली..आम्हीही झाडांच्या सावलीत बसून घरुन आणलेला खाऊचा नाष्टा केला.आणि आलेल्या मार्गाने घाटातून खाली उतरलो.व सापुतारा पहायला निघालो.
हटगड बोरगांव करत सापुताऱ्याकडे निघालो.. जून महिना असल्याने ऊन्हाची धग जाणवत होती.. शेतात बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या चाळी दिसत होत्या.त्यावरुन कांदा उत्पादक भाग दिसत होता.रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांनी स्टॉल लावले होते.त्यात कांद्याच्या दोन,पाच व दहा किलोच्या गोणी, लसणाची एक किलोची गोण विक्रीस ठेवले होते.काहींनी भाजीपाला ठेवला होता...आम्ही एका स्टॉलवर पाच किलोच्या दोन कांद्याच्या गोणी खरेदी केल्या.सत्तर रुपयाचे १० कांदे घेतले.डोंगर झाडाविना काळेभिन्नदिसत होते.
क्रमशः भाग--४३
भाग तीन
महाराष्ट्राची सीमा ओलांडून आम्ही गुजरातच्या डांग जिल्ह्यात प्रवेश केला.हा जिल्हा आदिवासी भाग आहे.गुजरातचे थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले आहे. हायवेला लागूनच हे स्थळ आहे.
निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी
गुजरात राज्यातील पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणी सहलीचा बेत आखतात. परंपरा आणि नावीन्यता यांची जपणूक करत इथल्या मंडळींनी सापुतारा हे आकर्षक बनवले आहे. आधुनिक पर्यटन शैलीत येणा-या गोष्टीदेखील या ठिकाणी उपलब्ध आहेत... पठारावर विविध प्रकारचे रायडिंग करता येते..डोंगराळ रांग, सुंदर सरोवर, डांग जंगल, अभयारण्य, न्याहाळत राहावा असा सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्या सोबतीला नयनरम्य महादेवाचे मंदिर, वस्तुसंग्रहालय, शिल्पाचे सौंदर्य, वनवाटिका, पुष्पक रोप वे, हनी सेंटर, रोड गार्डन, फॉरेस्ट नर्सरी, गोष्टी पर्यटकांना भुरळ पाडतात. बांबूपासून बनवल्या जाणा-या विविध कलाकुसरीच्या वस्तू या बाजारात विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
सापुता-याचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे पुष्कर रोप वे तिथं साहसी पर्यटक सापुता-याच्या एका कडय़ावरून दुस-या कडय़ावरचा प्रवास करतात. छोट्या ट्राॅलीतील चित्तथरारक प्रवास वाटतो. आम्ही तिथं तलावात पेडल बोटने बोटिंग केले.शॉपिंग केले. मस्तपैकी फोटोग्राफी केली.तिथं फोटोग्राफर ने काढलेल्या फोटोची प्रिंट घरात लावलेली आहे.. महाबळेश्वर इतके निसर्गाचे ओथंबून ऐश्र्वर्य तिथं जाणवलं नाही. एकदीड तास भटकंती करुन आम्ही परतिचा विचार मुंबईला जाण्याचा करत होतो.नाशिकमार्गे २४५ किमी तर बलसाड,वापी मार्गे ३२५ किमी होते...मग आम्ही परतीच्या मार्गाने नाशिक, इगतपुरी करत करत भायखळा मुंबईत पोहाचलो.
श्री राम कोंढाळकरने फोनवरून सांगितल्या प्रमाणे आम्ही राणीबाग जवळ पोहोचलो. गाडी चालवायला तो बसला... तो मुंबईत टुरिस्ट टॅक्सी मालक आहे.माहितगार चालक.तिथून आम्ही "गेटवे ऑफ इंडिया" पहायला आलो.. सायंकाळची भरपूर गर्दी होती. प्रवेशद्वाराचे जवळून अवलोकन केले.शिक्षकसंघाच्या धरणे आंदोलन वेळी सकाळी सकाळी इथं आल्याची आठवण झाली...तिथूनच प्रसिद्ध व नामांकित फाइव्ह स्टार हॉटेल लांबूनच पाहिले.त्याच्या समवेत फोटे काढले.व नवीन समुद्रावर झालेल्या वरळी ते बांद्रा सीब्रीजवरुन रफेट केली.जणूकाही सिनेमातीलच दृश्य पहात होतो...जीवाची मुंबई करताना यापूर्वी राहिलेला सी-ब्रीजआज पहायला मिळाल्याचे समाधान वाटले.तेथून आम्ही महालक्ष्मी मंदिर व मुंबईतील प्रसिद्ध श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरात देवदर्शन करून राणीबाग जवळील कोंढाळकरांच्या मुंबईतील खोलीवर आलो.फ्रेश होऊन चहापाणी घेतले.माजी विद्यार्थ्यांचा निरोप घेतला.तदनंतर वाशी कोपरखैरणे सेक्टर १० मध्ये अंकुशच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीवर गेलो.वडिलांना पायऱ्या चढायचा त्रास होवू नये म्हणून तळातील कल्पना ढवळेच्या खोलीवर जेवणाची सोय केली.
आम्हीही जेवण केले.व निरोप घेऊन अलिबाग कडे निघालो...ट्रफिक जाममुळे प्रवासातले अंतर तुटत नव्हते... पाली जवळ हायवेला मध्यरात्री मुक्काम केला.
क्रमशः भाग- ४४
भाग चार
सकाळी लवकर अलिबाग मध्ये आलो.नाक्यावरचं आम्हाला अलिबागमधील प्रेक्षणिय पर्यटनस्थळांचे हॅण्डवेल व नकाशा मिळाला..व अलिबाग बीचवरील कुलाबा किल्ला पहायला आलो...भरती असल्याने समुद्राचे पाणी किनाऱ्यावर आले होते.पाण्यातून दीड -एक किमी चालत जाणे शक्य नसल्याने आम्ही सर्वांसाठी घोडागाडी केली. घोडागाडीत किल्लाकडे निघालो.घोडागाडी बसल्यावर लहानपणी कधीतरी कराड स्टॅण्ड ते मंगळवार पेठेपर्यंत टांग्यातून आलेले लक्षात आले...
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ घोडागाडी थांबवली.. सगळेजण प्रवेशद्वारातून आत गेलो.पुरातत्व खात्याचे शुल्क भरून किल्ला पहायला सुरुवात केली...श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या जलदुर्गाची उभारणी झालेली आहे. मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या साम्राज्याचे केंद्र हा किल्ला होता.परकिय शत्रुंना थोपवून धरण्याचे कार्य या अभेद्य जलदुर्गाने केले आहे.आम्ही अलिबागकडील दरवाज्याने किल्ल्यावर आलो.प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत. किल्ल्यावर दोन प्रवेशद्वार आहेत.एक अलिबाग च्या बाजूला तर दुसरे समुद्राकडे आहे...गोड्या पाण्याचे बांधिव तळे व विहीर आहे... पद्मावती घुमटी व गडदेवीचे मंदिर आहे.बुरुजावर दोन तोफा आहेत.गणपती मंदिरात उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आहे..... भटकंतीत छानपैकी फोटोग्राफी केली.. सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढला.
सहलीत एक जलदुर्ग पाहून सगळे खुश झाले.. किल्लाउतरुन घोडागाडी जवळ आलो.तिथेही घोड्याचे लगाम हातात घेऊन घोडागाडी चालक मी,हर्षद, हर्षदा व प्रियंका झालो... मस्तपैकी एकेकाचे फोटो काढले...व गाडीत बसून किनाऱ्यावर आलो....
मुरुड जंजिरा पहायला अलिबाग मधून निघालो... समुद्रकिनाऱ्याच्या काठाने, नारळी पोफळीच्या गर्दसावलीत व डोंगररांगाच्या सहवासात प्रवास होता.वाटेतच एका ठिकाणी गाडी थांबवून आंबे ,फणस व अननस घेतले.गाडीतच सगळ्यांनी फलाहार केला.. बऱ्याच दिवसांनी चोखून आंबे खाल्ले...मजा आली.. डोंगर रस्त्याने घाटमाथा उतरुन काशिद बीच वर भर उन्हात पोहचलो...तापलेली वाळू, रुपेरी किनारा, निळेशार पाणी पहात किनाऱ्यावर आलो..पाण्यात उभे राहून फोटो काढले...उन्हातही हौशी पर्यटक समुद्रात डुंबण्याचा व अंघोळीचा आनंद घेत.धमाल मजा करत होती.. शेजारी हॉटेलमध्ये मुरुड ला जाण्याची चौकशी केली.त्याने हा रस्ता पुढे जातो..पण तुम्हाला किल्ला बघायला मिळणार नाही.जूनपासून किल्ला पहायला बंदी असते. खात्रीसाठी दुसरीकडे चौकशी केली.त्यानेही तेच सांगितले....मग परतीच्या प्रवासाला आमची सुरुवात झाली..
क्रमशः भाग- ४५
भाग पाचवा
काशिद बीच वरुन रोहा-करत हायवेला कोलाडला आलो...एका धाब्यावर मस्तपैकी मस्याहरी जेवण केले... माणगाव मध्ये टपोरी काळीशार जांभळं घेतली.व महाड--पोलादपूर करत पेठपार घाटाने कुंभरोशीत आल्यावर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमचमाट व कडकडाट ऐकू येऊ लागला.थोड्याच वेळात हवामान. बदलले वारा वेगाने वाहू लागला. हरोशीच्या जवळ पाऊसाने सुरुवात केली.. निसर्ग धाब्यावर आलो... गाडीतून खाली उतरलो.. हॉटेलमध्ये गेलो की पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली.. वाऱ्याच्या झोताबरोबर पाऊस वाढू लागला.योग्यवेळी थांबलो.. चहापान केले.आणि पाऊस उघडण्याची वाट बघत थांबलो..काळाभोर सगळीकडे दिसत होतं.लाईटही गेलेली..पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले..अर्ध्याएक तासाने पाऊस उघडला आणि चक्क ऊन पडले. आम्हीही घाटातून महाबळेश्र्वरात येऊन क्षेत्राकडे आलो.पंचगंगा नद्यांचे व महाबळेश्वर मंदिरात देवदर्शन करून.तेथून नाकिंदा मार्गाने केटस पॉईंटला आलो.पावसाने हवेत गारवा तर सगळीकडे पाणीच पाणी व चिखल झाला होता.गार वारा,हवेत गारवा अंगावर घेत निसर्गाचा आविष्कार पहायला आनंद झाला होता..खाली दिसणारे बलकवडी धरण, समोरच्या नवरा नवरी डोंगरावरील कमळगड पाऊस पडून गेल्यामुळे चकचकीत दिसत होता.मस्तपैकी विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.सगळेजण सापुतारा आणि महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याची चर्चा करु लागले..आपलेच सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हिलस्टेशन निसर्गाची मुक्तहस्ते उधळण केलेले लोकेशन. नैसर्गिकरीत्या हिरवेगार आणि उन्हळ्यातही गारवा देणारे सरस कसे आहे.हे स्पष्ट जाणवत होते..
तेथून चालत चालत निडल व एलिफंट पॉईंट पहायला चालत निघालो...बारीक बारीक पाऊसाला पुन्हा सुरुवात झाली.. कृष्णा खोरे,धोमजलाशय,वयगांव व इतर परिसर न्याहाळत पुढे आलो..उलट फिरुन दोन्ही पॉईंट बघितले....व फोटो काढले.. तेवढ्यात काही जण म्हणाले डोंगरकड्यातून कड्यातून खाली पाणी पडायला लागलय . वळून पहातोय तर काय! धबधबे सुरू झालेला बघायला मिळाला.
खरोखर आनंदी आनंदाचा क्षण निसर्गाचा विलोभनीय आविष्कार ... पडलेल्या पावसामुळे पाणी कड्यातील खाचेतून कड्यावरुन कोसळत होते. ते धबधबा सुरू झाला होता.. खुप छान आम्हीही थोडेफार पडणाऱ्या पावसाने भिजलो होतो...पुन्हा गाडीजवळ आलो...अवकाळी मार्गाने मेटगुताड येऊन कोठेही न थांबता वाईकडे प्रस्थान केले.अप्रतिम फॅमिली टूर संपन्न झाली..तीन दिवसात उन्हाळ्यातील सफर अंगाची लाहीलाही , समुद्रकिनाऱ्याचा दमटपणा ,डोंगरमाथ्यावरील वाऱ्याचा आवेग
,तीर्थक्षेत्रांचा भक्तिमय परिसर आणि अवकाळी आलेल्या घाटातील पावसाचा, पाऊस पडून गेल्यावर दिसणाऱ्या हिलस्टेशनच्या निसर्ग सौंदर्याचा आविष्कार .तीन दिवसात निसर्गाची विविध रूपे पहायला मिळाली.आपल्या घरच्या माणसांसोबत नवीन ऊर्मी आणि ऊर्जा मिळाल्याने ट्रीप सफल झाली....
Comments
Post a Comment