Posts

Showing posts from December, 2022

गरजू विद्यार्थ्यांला मदतीचा हात

सामाजिक दातृत्वाच्या कार्याचं प्रत्यक्ष दर्शन... आज मी माझ्या शाळेतील मुलांना आधारकार्ड काढण्यासाठी शहरातील एका बॅकेच्या आधारकेंद्रात घेऊन गेलो होतो.आधारकार्ड नोंदणी कुठे जावून करायची,कागदपत्रे कोणती लागतात. याचा गंधही नसलेले पालक,त्यात ते वंचित घटकातील त्यामुळे शिक्षणाची फारच अनास्था.शिष्यवृत्ती आणि शालेय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे लागणारी कागदपत्रे शाळेतच तयार करून गेले अनेक दिवस पेडिंग पडलेलं कार्य आज पुर्णत्वास गेले. आधार केंद्रावर अतिशय समंजस वृत्तीने तिथल्या ताईंनी सहकार्य केले. एका मुलाचे आधारकार्ड नोंदणी करताना त्यांचे लक्ष मुलांच्या पायाकडे गेले.त्यांंनी लगेच मला विचारणा केली.'मुलगा चपला घालून आला नाही का'  ''मॅडम होती त्याच्याकडे पण ती तुटली आहे.मी जाताना त्याला घेऊन देणार आहे.'' माझं उत्तर.  ''ती मुलं फारच गरीबा घरची दिसतायतं.''मॅडम अंदाजाने बोलल्या. आणि लगेच त्यांनी घरातील कोणालातरी संपर्क करुन बोलावून, त्या मुलाला रिक्षाने दुकानात नेहून त्याला नवीन चप्पल घेऊन दिली. अगोदर अनवाणी असणारा मुलगा थोड्याच वे...

एवढं पुकारा ओ...गुरुजी!

Image
उत्कर्ष..... एवढं पुकारा ओ….गुरुजी!   एवढं पुकारा ओ….गुरुजी! नोकरीच्या गावात,स्वताच्या गावात धार्मिक कार्यक्रमात विशेषतः लग्न समारंभ नाहीतर सामाजिक कार्यक्रमात त्यांच्या हक्काचा,हाक दिली की, हाकेला ओ देणारी व्यक्ती म्हणजे त्या गावच्या शाळेतील गुरुजी होय. साधारणपणे २५ते ३० वर्षांपूर्वी लग्नात स्वागत समारंभापेक्षा मानाचे पोशाख,आहेर,पेहरावा, नातेवाईकांची नवरदेव व नवरीमुलीला भेट आणि भावकीतल्या व्यक्तींचे मानपान करताना त्यांच्या नावाचा पुकारा माईकवरुन हमखास केला जायचा! हे काम बऱ्याचदा गावच्या शाळेतील गुरुजींना करावं लागायचं. त्यातूनच काहींच्या हातात नावं पुकरायला माईक आला.आपलाच माणूस म्हणून लोकं बोलवू लागली. बोलण्यातील तारतम्य आणि आवाजातील सफाईदारपणा लोकांना आवडू लागला. 'गुरुजी बेस काम झालं.'अशी जनमानसातील कौतुकाची थाप मिळू लागली. मग कार्यक्रमात पुकारायला गुरुजींनाच सांगायचं, याचं आवातणं मिळू लागलं.त्याचाच परिपाक म्हणजे आजतागायत कित्येक गुरुजी विविध सभा-संमेलन, लोकोत्सव कार्यक्रम, फेस्टिव्हल,लग्न समारंभ,बारशे, स्नेहसंमेलन,गॅदरिंग, विविध खेळांच्या स्पर्धा,बाल आनंद मेळावे,वाढदिवस, ...

परिसर भेट घळवी कोंढावळे

Image
आज आमच्या शाळेची सहल परिसर भेटीसाठी कोंढावळे गावातील डोंगर उताराच्या वहाळीच्या(ओढा) उगमा जवळील घळवी बघायला गेली होती. घळवीच्या डोक्यावर एक भलामोठा खडक येऊन बसलेला आहे.त्यामुळे आतमध्ये अतिशय गारवा असून पाण्याचा झिरप कमी होत आलेला आहे. आतमध्ये दहा-बाराजण आरामशीर बसतील एवढी जागा आहे.  सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे दगडातच घडीव गोल आकाराचे कुंड तयार झाले आहे. कुंड भरल्यानंतर पाणी लगतच्या भिंतीवरुन वाहत पुढे पुढे मोठ्या प्रवाहास मिळते. पावसाळ्यात तो प्रवाह पांढऱ्याशुभ्र धारेत प्रवाहित होताना अतिशय मजेशीर दिसत असतो.साधारणपणे ३० वर्षांपूर्वी याच घळवीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी वाडीतील लोकं करत होती.घळवीच्या आजुबाजुलाही मोठमोठाले ओबड धोबड दगड येऊन पडलेले दिसतात.           प्रत्यक्ष धबधबा वहात असताना त्याच्या पायथ्याला वहाळ कशी प्रवाहित होते.यांचे प्रत्यक्ष उदाहरण पहायला मिळाले.पायथ्याच्या भागात उतारती छोटीछोटी चंद्रकोरीच्या आकारात शेतीची खाचरं असून त्यातील नाचणी, वरी आणि भात ही पिकं काढलेली दिसून आली. तदनंतर पाण्याचा झिरप नसल्याने आणि जंगलातील प्राण्यांच्या वावरांमुळे...

पुस्तक परिचय क्रमांक:११६ आपण माणसात जमा नाही.

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११६ पुस्तकाचे नांव--आपण माणसात जमा नाही लेखकाचे नांव- राजन गवस प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथम आवृत्ती/ जुलै २०१७ पृष्ठे संख्या--१७६ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ११६||पुस्तक परिचय            आपण माणसात जमा नाही लेखक:राजन गवस ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃        भारतीय कृषीसंस्कृतीशी नाळ जोडणारे ,विश्वज वासल्य, कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी ज्या साहित्यात वाचायला मिळते.वास्तवाचे दर्शन तटस्थपणे वाचकांना होते.कृषीप्रधान जगण्याकडे आतून येणाऱ्या जाणिवेने आणि दूरस्थपणे पाहण्याची क्षमता ज्या साहित्यिकांना आहे.त्यातील लौकिकार्थाने राजन गवस यांचे साहित्य लोकप्रिय आहे.    महाराष्ट्रातील गावगाड्याचं बदलतं अवकाश आणि शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण ग्रामीण भागात कसेकसे पसरले आहे.याचा उलघडा 'आपण माणसात ...